महापालिका निवडणुकीसाठी भाजप-सेनेची महायुती

श्रमजीवी आणि आगरी सेनाही सोबत


विरार : वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून युतीची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासह आरपीआय (आठवले) यांना देखील सोबत घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे वसई-विरारमध्ये स्थानिक बहुजन विकास आघाडी पक्षासमोर आता केवळ भाजपचे नव्हे, तर महायुतीचे कडवे आव्हान असणार आहे.


वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अानुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये आघाडी आणि महायुतीबाबत खलबत्ते सुरू आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. तर बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करून महापालिका निवडणूक लढायची यासाठी उबाठा गट, काँग्रेस या दोनही पक्षातर्फे चर्चा सुरु आहेत. उबाठा गटाच्या नेत्यांनी मंगळवारीच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याशी भेट घेत आघाडी बाबत चर्चा केली. एकीकडे बविआ सोबत विविध राजकीय पक्षांच्या चर्चा सुरू असताना भाजप आणि शिवसेना युती करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे आमदार राजन नाईक यांनी जाहीर केले.


या युतीबाबत शिवसेना शिंदे गटाचे पालघर संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर तर भाजपकडून आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांची बुधवारी संयुक्त बैठक झाली. त्यानंतर आमदार नाईक आणि माजी आमदार फाटक यांनी युतीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्याचप्रमाणे युतीमध्ये भाजप - सेनेसह राष्ट्रवादी, आरपीआय ( आठवले ) आणि श्रमजीवी तसेच आगरी सेना या संघटनांना महायुतीमध्ये सामील केल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. तर जागा वाटपाबाबत स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले. निवडून येणारे उमेदवार हीच व्याख्या जागा वाटपासाठी लावण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या