पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांचा राजीनामा

मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची घेतली जबाबदारी


कोलकाता : अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ‘जीओएटी टूर’ कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याने अरूप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर अरूप विश्वास यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हाताने लिहिलेल्या पत्रात विश्वास यांनी म्हटले आहे की, या घटनेची ‘स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी’ सुनिश्चित करण्यासाठी ते पायउतार होत आहेत. मेस्सीचा भारत दौरा गोंधळात सुरू झाला. मेस्सी २० मिनिटांत तेथून निघून गेला. यानंतर १५ हजार रुपयांपर्यंत तिकीट घेतलेल्या संतप्त प्रेक्षकांनी मैदानात गोंधळ घातला.


Comments
Add Comment

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद