विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : शाळेतील मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत कठोर नियमावली लागू केली असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे नियम केंद्र सरकारच्या २०२१ च्या 'शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां'वर आधारित आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळेत मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण (उदा. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे) किंवा वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही.


दोन दिवसांमध्ये अहवाल पाठवणे बंधनकारक




  • कोणतीही अनुचित घटना घडली, तर मुख्याध्यापकांना ताबडतोब ती नोंद करावी लागेल आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. याशिवाय घटनेशी संबंधित सर्व पुरावे, जसे की मुलांची हजेरी, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी नीट जपून ठेवावे लागतील.

  • जर घटना गंभीर असेल, विशेषतः लैंगिक छळाशी संबंधित, तर पोक्सो कायद्याने आणि बाल न्याय कायद्याने २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.


शिस्तभंगाची कारवाई :


हे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली, तर त्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल. एखादे वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ढिलाई खपवली जाणार नाही. सर्व शाळांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी नीट होईल यासाठी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

विधिमंडळ हेही विनोदांना जन्म देणारे व्यासपीठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात 'जावे विनोदाच्या गावा' विशेष

पिंजऱ्यातील बिबट्यांचे दात आता राहणार सुरक्षित! लोखंडी गजांना आता 'प्लास्टिक कोटिंग' करणार; वनमंत्र्यांची घोषणा

मुंबई : मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्यांना पकडल्यानंतर पिंजऱ्यात त्यांना होणाऱ्या शारीरिक जखमा आणि त्यातून

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला