राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री


मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना शासकीय कोट्यातल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे यांना ठोठावलेली शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयानं कोकाटे यांच्या अटकेचे आदेश काढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांना आता बिनखात्याचे मंत्री करण्यात आले आहे. कोकाटेंकडे असलेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी पुढील निर्णय होईपर्यंत अजित पवारांकडे सोपविण्यात आली आहे.


कोकाटे यांच्याकडे असलेला मंत्रि‍पदाचा कार्यभार काढण्याची विनंती फडणवीसांकडून करण्यात आली. ती राज्यपालांनी मान्य केली. कोकाटे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आलेला आहे. या खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आलेली आहे.


माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही. याआधी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय दिला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. पण उच्च न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला. सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पण सुनावणी होण्याआधीच तब्येत बिघडल्याचे कारण देत कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.


कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचं पद रद्द होतं. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालाची पत्र प्राप्त झाल्यावर विधीमंडळ कार्यालय त्यांचा निर्णय घेणार आहे.


विधानसभेची निवडणूक जिंकल्यामुळे २०२४ मध्ये पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली. या सरकारमध्ये कृषीमंत्री झालेल्या कोकाटेंचे पद काही महिन्यांनी बदलण्यात आले. कोकाटे क्रीडामंत्री झाले. पण सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे दोषी ठरले. यानंतर कोकाटेंना बुधवार १७ डिसेंबर रोजी रात्री बिनखात्याचे मंत्री करण्यात आले.



धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहंची भेट


माणिकराव कोकाटे लिलावती रुग्णालयात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कोकाटेंचे मंत्रिपद आणि त्यांची आमदारकी धोक्यात असताना धनंजय मुंडेंनी अमित शाह यांची भेट घेतली. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री होते. पण करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. कौटुंबिक वादाची माध्यमातून चर्चा सुरू झाली. अखेर धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर धनंजय मुंडे अद्याप मंत्री झालेले नाहीत. पण आता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे कोकाटे अडचणीत सापडल्यास धनंजय मुंडे यांना मंत्री केले जाणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

Share Market Update : शेअर बाजारात सेन्सेक्स ६३९ अंकांनी वधारला; निफ्टी ही २४,००० च्या वर झाला बंद

मुंबई : मागील आठवड्यात सलग तीन दिवस घसरण अनुभवल्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात

“इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था आणि

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा

​Mahachatur AI Chatbot : महाचतुर एआय चॅटबॉटमुळे' कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​

असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू​ -​ ​मंगलप्रभात लोढा​,कौशल्य विकास