मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, "मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थाने आज निरोप घेतला असून, मराठी साहित्य क्षेत्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) जारी केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, औदुंबरसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेला श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांचा साहित्यप्रवास मराठी साहित्याला समृद्ध करणारा ठरला. औदुंबर परिसरावरील त्यांचे निस्सीम प्रेम आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्यांच्या ललित लेखनातून जिवंतपणे उमटली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी 'मौज' या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादकपद भूषवले आणि मराठी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण केली.
कवी, ललित लेखक आणि संपादक म्हणून त्यांनी मराठी साहित्याला मोलाचे योगदान दिले. 'मनातल्या उन्हात', 'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' यांसारख्या साहित्यकृतींनी रसिकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. विशेषतः 'डोह' या ललित लेखसंग्रहामुळे त्यांना 'डोहकार' ही ओळख लाभली. (Shrinivas Vinayak Kulkarni)
परदेशातून 'व्हॉइस नोट'द्वारे धमकीचा संदेश; पोलीस व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर मुंबई : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निर्घृण हत्येनंतर ...
मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) पुढे नमूद केले की, 'मौज' या नियतकालिकाच्या माध्यमातून श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांनी अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मराठी वाचकांना दर्जेदार आणि सकस साहित्याचा सातत्याने लाभ झाला. साहित्यसेवेचा वसा जपणाऱ्या अशा एका व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाला मराठी साहित्यविश्व मुकल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "महाराष्ट्रात उपजीविका करायची असेल, तर मराठी भाषेशी नाळ ...
श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas Vinayak Kulkarni) यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वातील एका समर्पित साहित्यसेवकाचा अंत झाला असून, त्यांच्या साहित्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.