पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या मसुदा मतदार यादीतून ५८.२ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केली. यापैकी सुमारे २४ लाख मतदार मृत आहेत.


पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली आहेत. रद्द केलेल्या नावांची एक स्वतंत्र यादी प्रकाशित केली आहे. वगळलेल्या नावांची यादी अधिकृत लिंकद्वारे उपलब्ध आहे. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील मतदार यादीतून सुमारे ५८.८ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. जनगणना आकडेवारीनुसार, पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ५८,०८,२०२ नावे वगळण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या गणनेनंतर वगळण्यासाठी चिन्हांकित केलेल्या नावांची संख्या ५८,०८,००२ होती.


निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात सध्या २४,१८,६९९ मृत मतदार आहेत, ज्यांची नावे अजूनही यादीत आहेत. याव्यतिरिक्त, १२,०१,४६२ मतदारांचा शोध लागलेला नाही. बूथ लेव्हल ऑफिसरने मतदाराच्या घरी ३ किंवा अधिक वेळा भेट दिली आणि त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. अशा व्यक्तीचे नाव बेपत्ता मतदारांच्या यादीत टाकले जाते. या पुनरीक्षण मोहिमेत १९,९३,०८७ असे मतदार देखील आढळले आहेत ज्यांनी आपले पत्ते बदलले आहेत. हे मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे आढळले. त्यांची नावे चुकीच्या पत्त्यावरून वगळली जातील आणि केवळ सत्यापित ठिकाणीच ठेवली जातील.


यादीत २४,१८,६९९ मृत मतदारांची नावे १,३७,५७५ मतदार बनावट असल्याचे उघड


५७ हजार ५०९ मतदारांनाही वगळणार : निवडणूक आयोगाने १,३७,५७५ मतदारांना बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नावे मतदार यादीच्या मसुद्यात समाविष्ट केली जाणार नाहीत. आणखी ५७,५०९ मतदारांना इतर श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि त्यांना देखील वगळण्यात येईल. आगामी राज्य निवडणुकांपूर्वी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी सुनिश्चित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान