पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट


कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या मसुदा मतदार यादीतून ५८.२ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ही यादी निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केली. यापैकी सुमारे २४ लाख मतदार मृत आहेत.


पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली आहेत. रद्द केलेल्या नावांची एक स्वतंत्र यादी प्रकाशित केली आहे. वगळलेल्या नावांची यादी अधिकृत लिंकद्वारे उपलब्ध आहे. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील मतदार यादीतून सुमारे ५८.८ लाख मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. जनगणना आकडेवारीनुसार, पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ५८,०८,२०२ नावे वगळण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या गणनेनंतर वगळण्यासाठी चिन्हांकित केलेल्या नावांची संख्या ५८,०८,००२ होती.


निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यात सध्या २४,१८,६९९ मृत मतदार आहेत, ज्यांची नावे अजूनही यादीत आहेत. याव्यतिरिक्त, १२,०१,४६२ मतदारांचा शोध लागलेला नाही. बूथ लेव्हल ऑफिसरने मतदाराच्या घरी ३ किंवा अधिक वेळा भेट दिली आणि त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. अशा व्यक्तीचे नाव बेपत्ता मतदारांच्या यादीत टाकले जाते. या पुनरीक्षण मोहिमेत १९,९३,०८७ असे मतदार देखील आढळले आहेत ज्यांनी आपले पत्ते बदलले आहेत. हे मतदार एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणीकृत असल्याचे आढळले. त्यांची नावे चुकीच्या पत्त्यावरून वगळली जातील आणि केवळ सत्यापित ठिकाणीच ठेवली जातील.


यादीत २४,१८,६९९ मृत मतदारांची नावे १,३७,५७५ मतदार बनावट असल्याचे उघड


५७ हजार ५०९ मतदारांनाही वगळणार : निवडणूक आयोगाने १,३७,५७५ मतदारांना बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांची नावे मतदार यादीच्या मसुद्यात समाविष्ट केली जाणार नाहीत. आणखी ५७,५०९ मतदारांना इतर श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि त्यांना देखील वगळण्यात येईल. आगामी राज्य निवडणुकांपूर्वी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी सुनिश्चित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या