अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत ५० जागा लढवणार?

नवाब मलिक यांनी घेतली बैठक; अहवाल अजित पवारांना देणार


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून भाजप-शिवसेना आणि रिपाइंने युतीची घोषणा केल्यानंतर, आता राष्ट्रवादीनेही मुंबईत ५० जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ५० जागा लढवण्याबाबत चर्चा झाली असून, त्याबाबतचा अहवाल बुधवारी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक मंगळवारी समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नवाब मलिक हे महिन्याच्या दर मंगळवारी आढावा बैठक घेत आहेत.


दि. १६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला मुंबई मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागा लढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याबाबतचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बुधवारी सूपुर्द केला जाणार आहे. या बैठकीला मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने