उल्हास खाडी प्रदूषित रसायनांचा साठा जप्त

ठाकुर्लीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडू्न कारवाई


डोंबिवली  : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली, कचोरे गाव हद्दीतील रेल्वे मार्गालगत एका गोदामातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घातक रसायनांचा मोठा साठा जप्त केला आहे. या पिंपांना गळती लागल्याने हे रसायन थेट उल्हास खाडीपात्रात मिसळून प्रदूषण करीत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांना मागील आठवड्यात ठाकुर्लीजवळील कचोरे गाव हद्दीत रेल्वेमार्गालगतच्या भागात पिंपांमध्ये रसायनांचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. हिरव्या जाळ्या बाजूने लावून हा साठा लपवून ठेवण्यात आला होता. या माहितीच्या आधारे अधिकारी कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी राजेश नांदगावकर यांच्या पथकाने ठाकुर्ली हद्दीत छापा टाकला. गावदेवी मंदिराच्या लगतच्या रस्त्यावर हिरव्या जाळ्या लावलेल्या एक बंदिस्त जागेत २५० पिंप आढळून आले. त्यामधील १०० पिंपामध्ये उग्र वासाचे, दुर्गंधीयुक्त घातक रसायन असल्याचे पाहणीत आढळून आले.


साठ्यातील पिंपांवर सोलापूर मोहोळ एमआयडीसी आणि भरुचा एमआयडीसीतील कंपन्यांचे पत्ते आढळले आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे का आणण्यात आला? या पिंपांमध्ये नेमक्या कोणत्या रसायनाचा साठा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात असे घातक रसायनांचे साठे निवासी विभागाजवळील परिसरात का केले जात आहेत, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.



गुन्हा दाखल


काही पिंपांना गळती लागली होती, ज्यामुळे पिंपांमधील रसायन खाडीपात्रात जाऊन मिसळत होते. यामुळे खाडीचे पाणी प्रदूषित होत होते. रात्रीच्या वेळी हे पिंप खाडीपात्रात खाली केले जात असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. परिसरातील रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा साठा रणजित पांडे या व्यावसायिकाने केल्याचे उघडकीस आले. त्याने पथकाकडे साठा केल्याची कबुली दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने हा सर्व साठा सील केला असून, रणजित पांडे याच्याविरुद्ध विष्णूनगर पोलिस ठाण्यात पर्यावरण संवर्धन आणि भारतीय न्याय संहितेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र

ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग

हत्या केली मात्र अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी केला चक्क सापाचा वापर; कशी केली काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याची हत्या?

बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा

स्मार्ट सिटीतील प्रकल्प रखडला, कल्याणकरांची प्रतीक्षा वाढली; उड्डाणपूल कधी खुला होणार?

कल्याण : कल्याण शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली