मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.


विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जेजे हत्याकांड प्रकरणात उत्तरप्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. अखेर २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. सुभाषसिंग ठाकूर याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.


सुभाष सिंह ठाकूर दाऊद टोळीशी संबंधित गुंड आहे.दाऊदचा मेव्हणा इस्माइल इब्राहिम पारकर याची हत्या झाली. यानंतर दाऊदच्या सूचनांचे पालन करत सुभाष सिंह ठाकूरने इस्माइल इब्राहिम पारकरच्या हत्येशी संबंधित आरोपींना एक एक करुन ठार केले होते. यानंतर सुभाष सिंह ठाकूरचे महत्त्व एकदम वाढले. पण मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर सुभाष आणि दाऊद यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला, असे सांगतात. मुंबई जवळच्या शहरांमध्ये सक्रीय असलेल्या बिल्डरांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हे उद्योग करुन ९० च्या दशकात सुभाष सिंह ठाकूरने स्वतःची दहशत निर्माण केली होती. दाऊदच्या संपर्कात आल्यामुळे तर त्याचे महत्त्व आणखी वाढले होते. पुढे अटक झाल्यानंतर तुरुंगात राहून सुभाष त्याचे साम्राज्य लिलया सांभाळत होता. पण मिरा भाईंदर वसई-विरार पोलिसांनी अटक केल्यामुळे सुभाष विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.