नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावणार, तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती

गोंदिया : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शरण या नाही तर मरा असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा पुरता बीमोड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना निर्देश दिले आहे. गृहमंत्र्यांकडून परवानगी मिळाल्यापासून सुरक्षा यंत्रणांनी आक्रमक होत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारी यंत्रणेचा हा आक्रमक पवित्रा बघून घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी शरणागती स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.


महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात तीन मोठ्या नक्षलवाद्यांची शरणागती स्वीकारली आहे. यामुळे राज्यातल्या नक्षलवाद्यांच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे. शरण आलेले तिन्ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. विदर्भात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडला लागून असलेल्या राज्याच्या सीमा भागातील नक्षलवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सरकारच्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला यश मिळू लागल्याचे चित्र आहे.


दरेकसा एरिया कमिटी कमांडर रोशन बेडजा (३५) याच्यासह सुभाष रव्वा (२६) आणि रतन पोयाम (२५) गोंदिया पोलिसांसमोर शरण आले आहेत. मागील काही महिन्यांपासून नक्षलवादी हातातील शस्त्र खाली टाकून आणि हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन शरण येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अलिकडेच नक्षलवादी भूपती, तारक्का यांनी आत्मसमर्पण केले. याआधी ११ नक्षलवादी शरण आले होते.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे