मुंबईत रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन'; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर : मुंबईतील जमिनींवर भूमाफियांच्या मदतीने रोहिंग्या मुसलमानांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि बांधकामे वाढत असल्याचा गंभीर मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. यावर राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत आता रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन' (Combing Operation) राबवण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली.



आमदार प्रसाद लाड यांनी वेधले लक्ष


विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. लाड यांनी सभागृहात धक्कादायक माहिती देताना सांगितले की, "मुंबईतील मोक्याच्या जमिनींवर काही भूमाफिया सक्रिय झाले आहेत. हे माफिया बेकायदेशीरपणे जमिनी बळकावून तिथे रोहिंग्यांचे पुनर्वसन करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, ही बाब मुंबईच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत."



सरकारची तत्काळ दखल, ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण


प्रसाद लाड यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा विषय अत्यंत संवेदनशील असून सरकार याकडे गांभीर्याने पाहत आहे.



मंत्री योगेश कदम यांनी केल्या चार महत्त्वाच्या घोषणा


१. कोम्बिंग ऑपरेशन: मुंबईतील ज्या भागांमध्ये रोहिंग्यांचे वास्तव्य असल्याचा संशय आहे, तिथे पोलिसांमार्फत तातडीने 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले जाईल.


२. संयुक्त कारवाई: ही कारवाई केवळ एका विभागाची नसून, 'गृह विभाग' आणि 'वन विभाग' (Forest Department) संयुक्तपणे मोहीम राबवतील.


३. ड्रोन सर्व्हे: दाट वस्तीच्या किंवा दुर्गम भागात लपलेल्या अनधिकृत झोपड्या शोधण्यासाठी आधुनिक ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वेक्षण केले जाईल.


४. अतिक्रमण हटाव: सर्वेक्षणानंतर आढळलेली सर्व बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात येतील.


विधान परिषदेत मिळालेल्या या आश्वासनामुळे मुंबईतील अवैध घुसखोरीवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा