'मुद्रांक सुधारणा विधेयक' पार्थ पवारांना वाचवण्यासाठी नाही!

अजित पवारांनी नाकारले आरोप; पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे दाखवले बोट


नागपूर :'अमेडिया' कंपनीशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारने मुद्रांक सुधारणा विधेयक आणले असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. अजित पवार यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, हे विधेयक पार्थ पवारांना वाचवण्यासाठी नसून, मुद्रांक आणि नोंदणी विभागातील तक्रारी थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी याव्यात, यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंढवा येथील जमीन व्यवहाराशी संबंधित प्रश्नावर शनिवारी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत अजित पवार म्हणाले, "व्यवहार होताना अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणे आणि चुकीच्या बाबी आढळल्यास कारवाई करणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांनी वेळीच भूमिका घेतली असती तर पुढचे प्रकार घडले नसते."
दरम्यान, या प्रकरणात कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले आणि कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पार्थ पवार यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शुक्रवारी विधानसभेत मंजूर झालेल्या मुद्रांक सुधारणा विधेयकात मुद्रांक विभागातील तक्रारी कोर्टात न जाता थेट मंत्र्यांकडे सुनावणीसाठी येण्याची तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी हे विधेयक पार्थ पवारांना फायदा पोहोचवण्यासाठी असल्याचा आरोप केला होता.

रायगडमधील संघर्ष थांबवण्यासाठी अजित पवारांची मध्यस्थी


दरम्यान, रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव कमी करण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी त्यांनी मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही चर्चा केली. दोन्ही पक्षांना वाद वाढवू नये, अशी विनंती केल्याचे पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले.

Comments
Add Comment

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Buldhana : बुलढाण्याचा अडीच वर्षांचा चिमुकला ठरला 'गुगल बॉय', फक्त २ मिनिटांत ७१ देशांच्या राजधान्या तोंडपाठ

'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये कोरले नाव बुलढाणा : ज्या वयात मुले अडखळत शब्द बोलू लागतात, त्याच वयात बुलढाणा