रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी तसेच ‘Housing for All’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या या निवेदनात रडार स्थलांतर आणि नव्या गृहनिर्माण धोरणाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.


दहिसर आणि जुहू परिसरात असलेल्या उच्च वारंवारता रडार केंद्रांच्या आजूबाजूला इमारतींच्या उंचीवर मर्यादा येत असल्याने या भागांचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. त्यामुळे ही रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकारआणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दहिसर येथील रडार गोरेगाव येथे स्थलांतरित करण्यास संमती दर्शवली आहे.


या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने स्थलांतराचा खर्च उचलण्याची तसेच पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेगाव येथील जमीन भारत सरकारकडे विनामूल्य हस्तांतरित केली जाणार असून, एएआय दहिसर येथील ५० टक्के जमीन सार्वजनिक बागेसाठी वापरणार आहे. एएआयच्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारसाठीही पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जुहू रडार स्थलांतराच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

महापुरुषांची नावे संक्षिप्त घेणाऱ्यांवर कारवाई करा; शिवसेना नगरसेवकांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने जोगेश्वरी रुग्णालयाचे नामकरण हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात