स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अंदमान येथे अनावरण

'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रमाचे आयोजन


नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या 'सागरा प्राण तळमळला' या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून .उद्या १२ डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे 'सागरा प्राण तळमळला' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेत थेट सहभाग आणि सहयोगीता नोंदवता आली हे माझे भाग्य आहे, अशा भावना मंत्री आशिष शेलार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.


अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील 'व्हॅल्युएबल ग्रुप'च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता 'सागरा प्राण तळमळला' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 'व्हॅल्युएबल ग्रुप'चे संचालक अमेय हेटे यांची संकल्पना असलेला हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे.


पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार लेखक डॉ. विक्रम संपत, अभिनेते शरद पोंक्षे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर होणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन मेराक इव्हेंट्सच्या करीत आहेत.

Comments
Add Comment

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा