Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संभाव्य युतीबाबत आज एक मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री नऊ वाजता मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.


या बैठकीत प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप युतीने एकत्र निवडणूक लढायची की नाही, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटप आणि युतीच्या फॉर्म्युल्यावर सखोल विचारमंथन होण्याची शक्यता आहे.


 


नवी मुंबईबाबत आज काय ठरणार?


या बैठकीच्या केंद्रस्थानी नवी मुंबई महानगरपालिका असणार आहे. नवी मुंबईत दोन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याने, या शहरात युतीचा नेमका पॅटर्न काय असेल आणि नेतृत्व कोणाकडे असेल, यावर आजच्या चर्चेत काही ठोस निर्णय घेतला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



अमित शहांच्या भेटीनंतर बैठकीला महत्त्व


या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण कालच (बुधवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांच्या भेटीनंतर लगेचच चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे युती संदर्भात एकत्र चर्चा करत असल्याने, या बैठकीत युतीच्या अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर दोन्ही पक्षांकडून युतीबाबत अधिकृत घोषणा केली जाते की नाही, यावर राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


 

 
Comments
Add Comment

लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Beed: दहावीच्या मुलीचं अपहरण करत...; पीकअप चालकाच्या कृत्याने परिसरात तीव्र संताप

बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील