बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याच्या तयारीत आहे. विधानपरिषदेत आमदार चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती (Task Force) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.



आमदार चित्रा वाघ यांनी मांडले बोगस डॉक्टरांचे धक्कादायक वास्तव :


विधानपरिषदेत बोलताना आमदार चित्रा वाघ यांनी राज्यातील बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाबद्दल अत्यंत भीषण वास्तव सभागृहासमोर ठेवले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केवळ १० वी पास असलेले लोक डॉक्टर बनून गरिबांच्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी काही हृदयद्रावक उदाहरणे देत सांगितले की, चेंबूरमधील 'ओम क्लिनिक' या अनधिकृत रुग्णालयात एका रिक्षाचालकाचा चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाला, तर गोवंडी सारख्या भागात अवघा १० वी पास असलेला व्यक्ती गेल्या ३ वर्षांपासून क्लिनिक चालवून रुग्णांना औषधोपचार देत आहे. इतकेच नव्हे तर, नानावटी सारख्या नामांकित रुग्णालयातही बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रॅक्टिस केली जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. "बोगस डॉक्टर आणि अनधिकृत रुग्णालयांचे मुख्य लक्ष्य झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्या आहेत, जिथे लोकांच्या हतबलतेचा फायदा घेतला जातो," असे सांगत त्यांनी या व्यवस्थेवर कडक 'सर्जिकल स्ट्राईक' करण्याची मागणी केली.

बोगस डॉक्टरांविरुद्ध राज्य सरकारचा मास्टर प्लॅन; मंत्री उदय सामंत यांच्या मोठ्या घोषणा :


आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, बोगस डॉक्टरांच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नगरविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (ACS) संयुक्त अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती केवळ कागदोपत्री चौकशी न करता संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकृत आणि अनधिकृत रुग्णालयांचा सविस्तर राज्यव्यापी सर्व्हे करून आढावा घेणार आहे. या मोहिमेत बोगस डॉक्टरांवर नेमकी काय कारवाई करण्यात आली, याचा संपूर्ण अहवाल सरकार आगामी अधिवेशनात सभागृहासमोर सादर करेल. मंत्री सामंत यांनी पुढे निर्देश दिले की, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करून महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने परस्पर समन्वय राखावा आणि दोषींवर थेट गुन्हे दाखल करावेत. केवळ दंड आकारून हा गंभीर प्रश्न सुटणारा नाही, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी विश्वास दिला की, गरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही बोगस डॉक्टरांना सरकार पाठीशी घालणार नाही. "राज्य सरकार या संदर्भात कठोर कायदेशीर पावले उचलण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त