ठाणे जिल्ह्यात ATS ची छापेमारी,साकीब नाचनच्या गावात मध्यरात्रीपासून झडती

ठाणे : दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या संशयावरून ठाणे जिल्ह्यात सक्तवसुली संचालनालय (ED) आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाला लागून असलेल्या बोरीवली या गावात बुधवारी रात्री उशिरा धाडी टाकण्यात आल्या. पडघा लगत असलेल्या बोरीवली गावातील अनेक घरांमध्ये तपास पथके दाखल झाली असून रात्रभर झडती घेण्यात आली.


साकीब नाचनच्या अटकेनंतर कारवाईला वेग


काही दिवसांपूर्वी साकीब नाचन याला एटीएसने अटक केल्यानंतर या कारवाईला अधिक वेग आला आहे. साकीब नाचन हा भिवंडी जवळील बोरीवली गावचा रहिवासी होता. एटीएसने केलेल्या तपासानुसार, साकीब हा स्लिपर सेल बनवण्यात आणि तरुणांची माथी भडकवण्यात पटाईत होता.


‘अल शाम’ नावाचा स्वतंत्र देश


मिळालेल्या माहितीनुसार, साकीब नाचन याने बोरीवली हे गाव 'वेगळा देश' म्हणून घोषित केला होता. या गावाला त्याने ‘अल शाम’ असं नाव दिलं होतं. इतकेच नव्हे, तर या 'अल शाम'साठी साकीबने स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र मंत्रिमंडळ देखील तयार केलं होतं.

Comments
Add Comment

मुंबईतील टँकर माफियांची लॉबी नष्ट करा; महापालिका सभागृहात सर्वच नगरसेवकांची एकमुखी मागणी

मुंबई: मुंबईत सध्या पाण्याची काही भागांमध्ये समस्या निर्माण झाली असून ही टंचाई फक्त आणि फक्त टँकर माफियांसाठी

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४