बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे वनविभागाने तैनात केले आहेत. त्यामध्ये निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव ही गावे बिबट्यांची हॉटस्पॉट केंद्र बनली आहेत. आठ गावातच २५ पिंजरे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बसवण्यात आले आहेत. ' या वनपरिक्षेत्रात ५५ गावे येत असून या भागात सर्वाधिक असलेला ऊसपट्टयात बिबट्या दबा धरून बसतो. घोडनदी आणि मीनानदी पात्र जवळ असल्याने पिण्यासाठी पाणी आणि सावज शेताच्या बांधाजवळच मिळत असल्याने बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले म्हणाले की, ''मंचर वनपरिक्षेत्रात एकूण ५५ गावे येतात, यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच ५५ गावांसाठी अवघे २० पिंजरे होते त्यामुळे पिंजरे लावण्यात अडचणी येत होत्या. सरकारकडून नव्याने ३६ पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत

INDvsAFG TEST : भारत विरुद्ध अफगाणिस्तान; एकमेव कसोटी सामना

PANJAB : मुल्लांपूर (नवी चंदीगड) येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि

Beed Suicide : लग्नाचा १२ वा दिवस अन् नवरदेवाची आत्महत्या! बायकोच्या डायरीत दडलं होतं 'ते' भयानक सत्य

बीड : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका तलाठ्याने लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत आत्महत्या (Suicide) केल्याच्या

Mumbai News: वाकोला-बीकेसी पुलाबाबत मोठी बातमी! ९८% काम पूर्ण, मुंबईकरांचा प्रवास होणार फक्त 10 मिनिटांत

मुंबई:मुंबई शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड (SCLR)