बिबट्यांना पकडण्यासाठी ३० गावांत ५१ पिंजरे

निरगुडसर  : बिबट्यांना पकडण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर वनक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे वनविभागाने तैनात केले आहेत. त्यामध्ये निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव ही गावे बिबट्यांची हॉटस्पॉट केंद्र बनली आहेत. आठ गावातच २५ पिंजरे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी बसवण्यात आले आहेत. ' या वनपरिक्षेत्रात ५५ गावे येत असून या भागात सर्वाधिक असलेला ऊसपट्टयात बिबट्या दबा धरून बसतो. घोडनदी आणि मीनानदी पात्र जवळ असल्याने पिण्यासाठी पाणी आणि सावज शेताच्या बांधाजवळच मिळत असल्याने बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले म्हणाले की, ''मंचर वनपरिक्षेत्रात एकूण ५५ गावे येतात, यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वीच ५५ गावांसाठी अवघे २० पिंजरे होते त्यामुळे पिंजरे लावण्यात अडचणी येत होत्या. सरकारकडून नव्याने ३६ पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतासाठी २०२५ वर्ष सर्वात उष्ण ठरणार?

नवी दिल्ली : जगभरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

राज्यात भीक मागणे हा गंभीर गुन्हा होणार

नागपूर : महाराष्ट्रात भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले.

मनसे प्रमुख राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

ठाणे : उत्तर भारतीयांना उत्तर देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात एप्रिल २०२२ मध्ये उत्तर सभा घेतली

GPS Tracker : नातवाच्या हुशारीमुळे सापडली हरवलेली आजी ,माळेतल्या जीपीएस ट्रॅकरची कमाल !

मुंबई : नातवाने GPS ट्रॅकर वापरून हरवलेल्या आजीला शोधून काढले.मोबाइलच्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत त्याने

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने