मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकिट बुकिंग वाढले असले, तरी त्याचबरोबर बनावट तिकिटांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याने रेल्वेने आता नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.


अनेक प्रवासी बनावट तिकिटांचा वापर करत असल्याचे उघड झाल्यानंतर टीसींची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याचबरोबर मासिक पास धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता पास काढताना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल. ऑनलाइन सीझन तिकीट बुक करतानाही प्रवाशांना वैध ओळखपत्राची माहिती सादर करावी लागेल. ओळखपत्रावरील तपशील आणि सीझन तिकिटावरील माहिती एकसारखी असणे बंधनकारक असेल. ओळखपत्र नसल्यास मासिक पास जारी केला जाणार नाही.


एसी लोकलमध्येही आता कडक तपासणी होणार असून टीसी प्रत्येक डब्यात जाऊन तिकिटे तपासतील. त्यामुळे विनातिकिट आणि बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने जीआरपीला बनावट तिकिट तयार करणाऱ्या आरोपींविरोधात जलदगतीने गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे.


या गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित अपराधांचा समावेश असून दोषी ठरल्यास दंडासह सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य