मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकिट बुकिंग वाढले असले, तरी त्याचबरोबर बनावट तिकिटांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याने रेल्वेने आता नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.


अनेक प्रवासी बनावट तिकिटांचा वापर करत असल्याचे उघड झाल्यानंतर टीसींची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याचबरोबर मासिक पास धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता पास काढताना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल. ऑनलाइन सीझन तिकीट बुक करतानाही प्रवाशांना वैध ओळखपत्राची माहिती सादर करावी लागेल. ओळखपत्रावरील तपशील आणि सीझन तिकिटावरील माहिती एकसारखी असणे बंधनकारक असेल. ओळखपत्र नसल्यास मासिक पास जारी केला जाणार नाही.


एसी लोकलमध्येही आता कडक तपासणी होणार असून टीसी प्रत्येक डब्यात जाऊन तिकिटे तपासतील. त्यामुळे विनातिकिट आणि बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने जीआरपीला बनावट तिकिट तयार करणाऱ्या आरोपींविरोधात जलदगतीने गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे.


या गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित अपराधांचा समावेश असून दोषी ठरल्यास दंडासह सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Comments
Add Comment

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने