मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकिट बुकिंग वाढले असले, तरी त्याचबरोबर बनावट तिकिटांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याने रेल्वेने आता नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.


अनेक प्रवासी बनावट तिकिटांचा वापर करत असल्याचे उघड झाल्यानंतर टीसींची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याचबरोबर मासिक पास धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता पास काढताना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल. ऑनलाइन सीझन तिकीट बुक करतानाही प्रवाशांना वैध ओळखपत्राची माहिती सादर करावी लागेल. ओळखपत्रावरील तपशील आणि सीझन तिकिटावरील माहिती एकसारखी असणे बंधनकारक असेल. ओळखपत्र नसल्यास मासिक पास जारी केला जाणार नाही.


एसी लोकलमध्येही आता कडक तपासणी होणार असून टीसी प्रत्येक डब्यात जाऊन तिकिटे तपासतील. त्यामुळे विनातिकिट आणि बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने जीआरपीला बनावट तिकिट तयार करणाऱ्या आरोपींविरोधात जलदगतीने गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे.


या गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित अपराधांचा समावेश असून दोषी ठरल्यास दंडासह सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार