बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार


ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच, नामदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेवरून, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक पावले उचलत घोडबंदर रोडसह महत्त्वाच्या मार्गांवर बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. येत्या काही दिवसांत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीमही राबवली जाणार आहे.


प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशानुसार वायुदत पथक क्रमांक १ ते ५, तसेच १० मोटार वाहन निरीक्षकांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शीतपेय गाड्या, ट्रॅव्हल्स, खासगी बस, वजनदार वाहने तसेच नियमबाह्य पार्किंग, परवाना नोंदणीतील त्रुटी, ध्वनी-प्रदूषण वाढवणारे फेरफार अशा नियमभंगांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर
यांनी दिली.


अनेक वाहनचालकांकडून हेल्मेट न वापरणे, लेनची शिस्त न पाळणे, दुचाकींवर तिघे जण बसवणे, अवैधपणे मालवाहतूक करणे असे प्रकार नियमितपणे दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘विशेष तपासणी मोहीम’ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, दररोज कडक दंडात्मक कारवाई, वाहन जप्ती, परवाना रद्द करणे अशा कठोर दंडांची तरतूद केली जाणार आहे.



Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू