बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार


ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच, नामदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेवरून, ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कडक पावले उचलत घोडबंदर रोडसह महत्त्वाच्या मार्गांवर बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाई सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. येत्या काही दिवसांत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीमही राबवली जाणार आहे.


प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या आदेशानुसार वायुदत पथक क्रमांक १ ते ५, तसेच १० मोटार वाहन निरीक्षकांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शीतपेय गाड्या, ट्रॅव्हल्स, खासगी बस, वजनदार वाहने तसेच नियमबाह्य पार्किंग, परवाना नोंदणीतील त्रुटी, ध्वनी-प्रदूषण वाढवणारे फेरफार अशा नियमभंगांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर
यांनी दिली.


अनेक वाहनचालकांकडून हेल्मेट न वापरणे, लेनची शिस्त न पाळणे, दुचाकींवर तिघे जण बसवणे, अवैधपणे मालवाहतूक करणे असे प्रकार नियमितपणे दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी ‘विशेष तपासणी मोहीम’ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, दररोज कडक दंडात्मक कारवाई, वाहन जप्ती, परवाना रद्द करणे अशा कठोर दंडांची तरतूद केली जाणार आहे.



Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास