'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे तातडीने भरावी. ग्रामीण भागात जिथे शिक्षकांची पदे रिक्त आहे तिथे पण तातडीने भरती करावी; अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मुलांना खासगी शाळेत शिक्षण देऊ शकतात. पण ग्रामीण भागात, खास करुन दुर्गम भागात, विरळ लोकसंख्येच्या भागात मुलं सरकारी शाळांमध्येच शिकतात. यामुळेच सर्वांगीण विचार करावा. ग्रामीण भागातील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरावी; अशी आग्रही मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


यवतमाळच नाही तर संपूर्ण राज्यात ग्रामीण भागात जिथे विद्यार्थी संख्याच कमी आहे आहे तिथे शिक्षकांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.


पंतप्रधान मोदी २०४७ पर्यंत देश विकसित करण्याचे स्वप्न बघत आहेत. पण विकास करायचा तर देशाच्या ग्रामीण भागाला मागे ठेवून चालणार नाही, तिथला शिक्षकांचा प्रश्न सोडवून शिक्षण देण्याची व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे, असे शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी म्हणाले.


Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि