पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना उडवले होते. अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याआधी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळासाठी सेवेतून निलंबित केले होते.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना पोर्शे अपघात प्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केल्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांचा पोलीस दलातील कार्यकाळ संपला आहे, त्यांना निवृत्ती अथवा स्वेच्छानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ मिळणार नाही. निवृत्ती वेतनासाठी पण हे दोघे अपात्र झाले आहेत. पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्षे पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताची माहिती वरिष्ठांना न कळवणे. सुरुवातीचा तपास करताना गंभीर स्वरुपाच्या त्रुटी ठेवणे असे गंभीर आरोप बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांवर असल्याचे वृत्त आहे.

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी आधी १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलाला अटक केल्याचे जाहीर केले. सध्या हा मुलगा जामिनावर आहे. बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला फक्त १४ तासांत १०० शब्दांचा निबंध तसेच 'समाजसेवा' आणि 'अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे' अशा अटी घालून जामीन दिला.
Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी