पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांविरोधात मोठी कारवाई

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मे २०२४ रोजी पोर्शे कारचा अपघात झाला होता. पोर्शे कारने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना उडवले होते. अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधियाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. याआधी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळासाठी सेवेतून निलंबित केले होते.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना पोर्शे अपघात प्रकरणात पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी या दोघांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केल्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांचा पोलीस दलातील कार्यकाळ संपला आहे, त्यांना निवृत्ती अथवा स्वेच्छानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ मिळणार नाही. निवृत्ती वेतनासाठी पण हे दोघे अपात्र झाले आहेत. पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्षे पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताची माहिती वरिष्ठांना न कळवणे. सुरुवातीचा तपास करताना गंभीर स्वरुपाच्या त्रुटी ठेवणे असे गंभीर आरोप बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांवर असल्याचे वृत्त आहे.

पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी आधी १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलाला अटक केल्याचे जाहीर केले. सध्या हा मुलगा जामिनावर आहे. बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला फक्त १४ तासांत १०० शब्दांचा निबंध तसेच 'समाजसेवा' आणि 'अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे' अशा अटी घालून जामीन दिला.
Comments
Add Comment

संगमनेर येथील 'पोकळी हिस्से' नोंदीचा प्रश्न मार्गी

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील इंदिरा नगर भागात सर्वे

नाशिक - पुणे रेल्वे मार्गात बदल, अहिल्यानगरचे नागरिक नाराज

नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या

दीपावलीला युनेस्कोचा दर्जा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात केले निवेदन

नागपूर : युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावलीचा समावेश करण्यात आल्याने भारतीय संस्कृतीचा जगभर

महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा गंभीर प्रश्न; नागपूर अधिवेशनात आमदार सोनवणे यांनी वेधले लक्ष, 'राज्य आपत्ती' घोषित करण्याची मागणी

नागपूर : महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीत घुसून होणाऱ्या जीवघेण्या

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर