संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी संगमनेर नगरपालिकेत जोरदार राडा पाहायला मिळाला. नगरसेवक शैलेश कलंत्री आणि नगरसेवक योगेश जाजू यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करत प्रशासकीय कारभाराचा पाढा वाचला.


म्हाळुंगी नदी आणि नदी किनाऱ्याचा परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर प्रभागातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्यामुळे नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. या कामांबाबत वारंवार मुख्याधिकाऱ्यांना भेटून आणि निवेदने देऊनही कोणतीही हालचाल होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अखेर बुधवारी सकाळी नगरसेवक शैलेश कलंत्री आणि नगरसेवक योगेश जाजू यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन त्यांना कामांबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. आंदोलनादरम्यान नगरसेवक आक्रमक झाले होते. शहरात समस्यांचा डोंगर साचला आहे, मात्र अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कामे सांगूनही जर ती मार्गी लागत नसतील, तर अशा ठिकाणी बसून उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दालनातून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.


या आंदोलनानंतर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. चर्चेअंती त्यांनी नदीवरील पाण्याच्या डबक्यांचा प्रश्न मार्गी लावला. तसेच प्रशासकीय पातळीवर तांत्रिक अडचणींमुळे काही कामे थांबली असून ती लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.


नगरसेवकांचा इशारा


आम्ही आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी यांनी त्वरित त्यावर कारवाई केली, परंतु आज जे काही आंदोलन करण्यात आले, हा तर फक्त ट्रेलर आहे. यापुढे जर पुन्हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यास नगरपालिकेने असमर्थता दाखवली तर आणखी तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा नगरसेवक कलंत्री आणि जाजू यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे