माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. राकेश किशोर नावाच्या वकिलाने ऑक्टोबर महिन्यात हे दृष्कृत्य केले होते. या घटनेचा देशभरातली सामाजिक कार्यकर्ते, विद्वान, बुद्धीजीवींनी निषेध केला होता. या घटनेच्या निषेधार्थ राकेश किशोर यांना न्यायालयाच्या परिसरातच काही वकिलांनी इंगा दाखवला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून समजते की, राकेश किशोर यांना थेट चप्पलने मारहाण करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्लीतील करकडडूमा न्यायलयाच्या परिसरात ही घटना घडली आहे. राकेश किशोर या वकिलाला काही वकिलांनी थेट चप्पलने मारहाण केली आहे. राकेश किशोर करकडडूमा न्यायालय परिसरात आला होता. यावेळी त्याला काही वकिलांनी घेरून मारहाण केली. त्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून राकेश किशोर याला बाहेर काढले.





दरम्यान, आता राकेश किशोर याला मारहाण झाल्यानंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर देऊ नये, असे मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. तर राकेश किशोर याला चपलेने मारले ते योग्यच केले असेही काही लोक म्हणत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला