राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा होतो. पण हा मार्ग दोन पदरी असल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने होते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. पण हा रस्ता अनेक ठिकाणी वन क्षेत्रातून जातो. यामुळे निवडक ठिकाणी चौपदरीकरण आणि काही ठिकाणी तीन पदरी पण मजबूत रस्ता बांधून काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. एकूण ११७ किमी.च्या या महामार्गापैकी ७० किमी. चे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकर दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा यामुळे. मुंबईकरांना आणखी मोठ्या प्रमाणात दूध भाजीपाला ताज्या स्वरुपात मिळेल.


नवी मुंबईत वाशी येथे असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ६० ते ७० टक्के माल कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन येतो. आता रस्ता रुंदीकरणामुळे मालाची आवक वेगाने होईल.


अहिल्यानगर जिल्ह्यातून दररोज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन पुढे माळशेज घाट, मुरबाड, कल्याणमार्गे नवी मुंबईत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल पोहोचतो. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढेल. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकाधिक ताजा माल पोहोचू शकेल.

Comments
Add Comment

Borivali National Park Toy Train : वनराणी इज बॅक! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा एकदा पर्यटकांच्या

मुंबईकरांसाठी मोठी संधी! म्हाडाची २५०० घरांची लॉटरी, तारीख झाली जाहीर

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या मालमत्ता दरांमुळे सर्वसामान्यांना घर

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल मुंबई  : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर

गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेत मराठी शाळा शिकवली

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा