राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा होतो. पण हा मार्ग दोन पदरी असल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने होते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. पण हा रस्ता अनेक ठिकाणी वन क्षेत्रातून जातो. यामुळे निवडक ठिकाणी चौपदरीकरण आणि काही ठिकाणी तीन पदरी पण मजबूत रस्ता बांधून काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. एकूण ११७ किमी.च्या या महामार्गापैकी ७० किमी. चे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकर दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा यामुळे. मुंबईकरांना आणखी मोठ्या प्रमाणात दूध भाजीपाला ताज्या स्वरुपात मिळेल.


नवी मुंबईत वाशी येथे असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ६० ते ७० टक्के माल कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन येतो. आता रस्ता रुंदीकरणामुळे मालाची आवक वेगाने होईल.


अहिल्यानगर जिल्ह्यातून दररोज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन पुढे माळशेज घाट, मुरबाड, कल्याणमार्गे नवी मुंबईत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल पोहोचतो. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढेल. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकाधिक ताजा माल पोहोचू शकेल.

Comments
Add Comment

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची

Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेवर धावणार १५ डब्याच्या लोकल ; वांद्रे स्थानकावरून....

मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता उपनगरी रेल्वे व्यवस्थेवर

Sanika Shah: मुंबईतील सानिका शाहची एव्हरेस्ट मोहिमेकडे वाटचाल; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : मुलुंड येथील २१ वर्षीय गिर्यारोहक सानिका जिगर शाह एव्हरेस्ट सर करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी