राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा होतो. पण हा मार्ग दोन पदरी असल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने होते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. पण हा रस्ता अनेक ठिकाणी वन क्षेत्रातून जातो. यामुळे निवडक ठिकाणी चौपदरीकरण आणि काही ठिकाणी तीन पदरी पण मजबूत रस्ता बांधून काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. एकूण ११७ किमी.च्या या महामार्गापैकी ७० किमी. चे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकर दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा यामुळे. मुंबईकरांना आणखी मोठ्या प्रमाणात दूध भाजीपाला ताज्या स्वरुपात मिळेल.


नवी मुंबईत वाशी येथे असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ६० ते ७० टक्के माल कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन येतो. आता रस्ता रुंदीकरणामुळे मालाची आवक वेगाने होईल.


अहिल्यानगर जिल्ह्यातून दररोज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन पुढे माळशेज घाट, मुरबाड, कल्याणमार्गे नवी मुंबईत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल पोहोचतो. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढेल. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकाधिक ताजा माल पोहोचू शकेल.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन