महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची अद्ययावत माहिती तातडीने जमा करून त्यांची कार्यस्थिती तपासण्याचे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. सन २००९ मध्ये अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या काळात महानगरपालिकेने सार्वजनिक वापराच्या विहिरींची दुरुस्ती करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले होते. त्या धर्तीवर सद्यस्थितीत सर्व विहिरींची कार्यक्षमता तपासून, ज्या विहिरी तात्काळ कार्यान्वित करता येऊ शकतात, त्यांना प्राधान्याने सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशा सूचना महापौरांनी केल्या आहे. शिवाय याचे पाणी केवळ बागकाम किंवा स्वच्छतेपुरता मर्यादित वापर न ठेवता, चाचण्यांच्या आधारे या विहिरींमधून सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा कितपत वापर करता येईल, याचाही अभ्यास करून त्यानुसार नियोजन करावे, असेही निर्देश महापौर तावडे यांनी दिले आहेत.


उन्हाळ्याची वाढती तीव्रता, जलसाठ्यांवरील वाढता ताण तसेच पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून मुंबईकरांना अखंडित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अधिक परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.


मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्जन्यमानातील अनिश्चितता लक्षात घेता पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक शाश्वत व बहुआयामी पद्धतीने करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यातच, सद्यस्थितीत उन्हाळ्याची तीव्रता देखील वाढू लागली आहे. या अनुषंगाने, पारंपरिक जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यायी जलस्रोतांचा शोध तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागाद्वारे पाणी बचत व संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न करण्यावर भर देण्याची आवश्यकता महापौरांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान, मुंबईतील पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता, खासगी गृहनिर्माण संस्थांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातील विहिरी व कूपनलिकांची नियमित देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता करून आवश्यक त्या जलशुद्धीकरण यंत्रणा बसवाव्यात. तसेच भूजलाचा उपसा करताना तो नियमानुसार व शाश्वत मर्यादेत राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टींग) ही अत्यंत महत्त्वाची उपाययोजना असून, सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरात अशी यंत्रणा कार्यान्वित करावी. यामुळे भूजल पातळी स्थिर राखण्यास मदत होईल तसेच दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असे आवाहन महापौर तावडे यांनी केले आहे.



महापौरांच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग, मुंबईकरांना त्यांनी केले आवाहन



"घाटकोपर येथे मी राहत असलेल्या गृहनिर्माण संकुलामध्ये पावसाचे पाणी पुनर्भरण करणारी यंत्रणा, कूपनलिकेचे पाणी पिण्यायोग्य शुद्ध करून सर्व सदनिकांमध्ये पुरवठा करणारी यंत्रणा, हे सर्व आधीपासूनच कार्यान्वित केले आहे. त्याचे अनुकरण इतरांनीही करावे," असे आवाहन महापौर तावडे यांनी केले आहे.


पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे सर्वसमावेशक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनासोबत नागरिक, गृहनिर्माण संस्था व उद्योग क्षेत्र यांचा समन्वयित सहभाग आवश्यक आहेअसेही त्यांनी आवाहन केले आहे.


Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा