खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती सरकारने सेवाशर्तींच्या विनियमनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचे अध्यादेश सादर केले. त्यानुसार, खासगी कर्मचाऱ्यांना अधिकची साप्ताहिक सुट्टी मिळणार असून, कामाचे तास आणि ओव्हरटाइममध्ये लवचिकता आणली जाणार आहे.


कामगार मंत्र्यांनी सादर केलेल्या अध्यादेशानुसार, छोट्या व्यावसायिकांना नोंदणी आणि इतर नियमांसाठी १० कर्मचाऱ्यांची मर्यादा आता २० पर्यंत वाढवली जाईल. म्हणजे २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना फक्त व्यवसायाची माहिती द्यावी लागेल, पूर्ण नोंदणीची गरज भासणार नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या इतर सुरक्षा आणि त्यासंबंधीचे कायदे कायम राहतील. कामाच्या तासांमध्येही लवचिकता आणली जाईल. आठवड्यात एकूण ४८ तासांच्या मर्यादेत राहून, दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० पर्यंत वाढवले जातील. यात विश्रांती कालावधीचाही समावेश आहे. हे बदल आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आस्थापनांना मदत करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


 
Comments
Add Comment

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BMC News : मुंबईतील सर्व ऑक्सिजन प्लांटचे ऑडीट करा; स्थायी समितीने दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) कोविड काळात मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये तसेच कोविड

BMC News : वाणीतून नाहीतर भाजपाने करून दाखवले; सुमारे २७० कोटी रूपयांची बचत करत गारगाई पाणी प्रकल्पाला दिली मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थायी समितीने फेरविचारासाठी पाठवून दिलेला गारगाई पाणी प्रकल्पाला अखेर स्थायी समितीने

मुंबईतील १९८५ ते २०२५ पर्यंतच्या आरक्षित वास्तूंचा शोध घ्या, कागदपत्रे तपासा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सार्वजनिक सुविधा, समाज कल्याण केंद्र, निवासी आरक्षण असलेल्या महानगरपालिकेच्या वास्तू,

अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी है तो सब मुनकीन है

लक्ष्यापेक्षा २७० कोटी रुपयांची मालमत्ता कराची अधिकची वसुली मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या

Mumbai : ना सोसाट्याचा वारा सुटला, ना पाऊस पडला पण झाडाची फांदी तुटून एकाचा मृत्यू झाला

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नागरिक असह्य उकाड्याने हैराण आहेत, त्याचवेळी राज्याच्या काही