शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा अधिक होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.


लिलाबाई कदम या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या आजी होत्या. वयोमानानुसार प्रकृती ढासळल्यामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या स्वभावाने शांत, स्नेहशील आणि धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कदम कुटुंबातील अनेक सदस्य सामाजिक कार्यात पुढे आले.


मृत्युसमयी त्यांच्या मागे चार मुलांसह सुना, जावई, नातवंडे, पतवंडे आणि मोठा परिवार आहे. लिलाबाई कदम यांच्या निधनाबद्दल स्थानिक सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या जाण्यामुळे कदम कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Mithi River : मिठी नदीत डेब्रीज टाकून वाढवले जाते गाळाचे वजन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील मिठी नदीच्या सफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत याचे २७ टक्के काम

Mumbai : पश्चिम उपनगरांतील नाल्यांची, पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नदीसह मोठ्या आणि छोट्या नाल्‍यातून गाळाच्या सफाई कामे अधिक परिणामकारक आणि पारदर्शकपणे

Mumbai News : कामाठीपुरातील ७० अनधिकृत फेरीवाले व जुने भंगार विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील विविध ठिकाणांवरील सुमारे ७० अनधिकृत फेरीवाले व

Patra Chawl : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय; इमारतींची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश मुंबई : गेल्या

Bamboo Plantation : कांजूरमार्गमधील कचरा दुर्गंधीवर ‘बांबू’ लागवडीचा उपाय

उपमुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश; कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाची तातडीने कार्यवाही करण्याचे

धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर, तरुणानं संतापाच्या भरात प्रेयसीसह तिच्या आईला संपवलं

Crime News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाने