मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक त्रासाचा आणि अन्य समस्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत महिलांना मोठा दिलासा दिला आहे.



महिलांच्या हाताच्या सुरक्षेसाठी मोठी घोषणा


मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, कोळंबी सोलण्याचे काम करणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या महिलांना काम करताना होणारा त्रास आणि हाताला होणारी इजा यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल. नितेश राणे म्हणाले, "कोळंबी सोलताना मच्छीमार विकणाऱ्या महिलांच्या हाताला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत तयार केलेले आणि काही विदेशामधून महिलांच्या सुरक्षेसाठी 'हँड ग्लोज' मागवण्यात येणार आहेत." या हँड ग्लोजमुळे महिलांना काम करताना हाताला होणारे नुकसान आणि होणारा त्रास टळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.



दुर्गंधीवरही तोडगा काढणार


केवळ हाताच्या त्रासावरच नव्हे, तर मासे आणि कोळंबीमुळे होणारी घाण आणि दुर्गंधी यावर सुद्धा उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन मंत्री राणे यांनी सभागृहात दिले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी, लवकरच कोळंबी सोलणाऱ्या आणि मासे विकणाऱ्या ताईंबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या जातील, असेही नितेश राणे यांनी यावेळी नमूद केले. या निर्णयामुळे किनारी भागात आणि मच्छीमारी व्यवसायात कार्यरत असलेल्या हजारो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत