Stock Market Update: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात तुफान घसरण सेन्सेक्स ६०९.६८ अंकांने व निफ्टी २२५.९० अंकांनी घसरला

मुंबई: सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील घसरण अखेरच्या सत्रात कायम राहिली आहे. बाजारातील अस्थिरतेचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. सेन्सेक्स ६०९.६८ अंकांने व निफ्टी २२५.९० अंकांनी मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात अखेरच्या सत्रात झालेल्या तुफान घसरणीचा फटका बाजारात आणखी गुंतवणूकदारांना बसला. मिड व स्मॉलकॅप शेअर्समध्ये लार्जकॅप शेअर्ससह घसरण झाल्याने बाजारात फटका बसला. युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अपेक्षा कायम असताना अस्थिरतेचा फटका भारतीय बाजारासह आशियाई बाजारातही बसला आहे.


अखेरीस मिडिया (२.७३%), पीएसयु बँक (२.८१%), हेल्थकेअर (१.४२%) समभागात सर्वाधिक घसरण झाली आहे. अखेरच्या सत्रात लेटंट व्ह्यू (१०.३०%), निवा बुपा हेल्थ (२.६४%), ३एम इंडिया (२.३२%), होम फर्स्ट फायनान्स (२.२०%), आयटीआय (१.४६%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण केईंस इंडिया (१२.५५%), इंटरग्लोब एव्हिऐशन (८.३२%), होनसा कंज्यूमर ड्युरेबल्स (६.७६%),डेटा पँटर्न (६.४७%), सारेगामा इंडिया (६.४७%), रिलायन्स पॉवर (६.५०%), हुडको (५.५२%) समभागात झाली आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' या आठवड्याच्या फेड धोरण निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने बाजाराने व्यापक पातळीवर घसरण अनुभवली, २६००० पातळीच्या खाली घसरण झाली. मजबूत देशांतर्गत वाढीचे आकडे आणि आरबीआयच्या अलिकडच्या दर कपातीनंतरही, जागतिक चलनविषयक धोरणांच्या चिंता, सततचा एफआयआयचा बहिर्गमन आणि चलन अवमूल्यन यामुळे अल्पकालीन भावनांवर सावली आहे. जपानी बाँड उत्पन्नात अनेक वर्षांच्या उच्चांकी वाढ झाल्यामुळे अस्थिरता आणखी वाढली, ज्यामुळे येन कॅरी ट्रेडमध्ये संभाव्य मंदीची भीती निर्माण झाली.'

Comments
Add Comment

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे

महापौरांनी जाहीर केला १०० दिवसांचा कार्यक्रम

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला