वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत वंदे मातरम या विषयावरील चर्चेला सुरुवात करतील. यानंतर सत्ताधारी आणि विरोध गटातील निवडक सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारचा हेतू वंदे मातरमचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याची भूमिका आणि त्याची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकता यावर चर्चा करणे हा आहे. शिवाय, १९३७ मध्ये काँग्रेस पक्षाने काढून टाकलेल्या काही ओळींवरून मुख्य विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून वंदे मातरमवरून काँग्रेस पक्षावर सतत टीका करत आहेत. वंदे मातरम संदर्भातल्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, १९३७ मध्ये काँग्रेसने वंदे मातरम मोडून देशाच्या फाळणीचे बीज पेरले. पंतप्रधानांनी याला काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण म्हटले. म्हणूनच, आज जेव्हा या मुद्द्यावर चर्चा होईल तेव्हा दोन्ही बाजू एकमेकांवर तीव्र राजकीय हल्ले करताना दिसण्याची शक्यता आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेला लक्षात घेऊन 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरे करण्यास मंजुरी दिली.
Comments
Add Comment

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील