वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत वंदे मातरम या विषयावरील चर्चेला सुरुवात करतील. यानंतर सत्ताधारी आणि विरोध गटातील निवडक सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारचा हेतू वंदे मातरमचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याची भूमिका आणि त्याची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकता यावर चर्चा करणे हा आहे. शिवाय, १९३७ मध्ये काँग्रेस पक्षाने काढून टाकलेल्या काही ओळींवरून मुख्य विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून वंदे मातरमवरून काँग्रेस पक्षावर सतत टीका करत आहेत. वंदे मातरम संदर्भातल्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, १९३७ मध्ये काँग्रेसने वंदे मातरम मोडून देशाच्या फाळणीचे बीज पेरले. पंतप्रधानांनी याला काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण म्हटले. म्हणूनच, आज जेव्हा या मुद्द्यावर चर्चा होईल तेव्हा दोन्ही बाजू एकमेकांवर तीव्र राजकीय हल्ले करताना दिसण्याची शक्यता आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेला लक्षात घेऊन 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरे करण्यास मंजुरी दिली.
Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या