भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी करत आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या निर्णयामागे बांगलादेशातील परिस्थिती कारणीभूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना विचारण्यात आले की, शेख हसीना जितका काळ इच्छितात तितका काळ भारतात राहू शकतात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हा वेगळा प्रश्न होता. त्या काही खास परिस्थितींमध्ये येथे आल्या, पण निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.” परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की भारत हा बांगलादेशचा शुभचिंतक आहे.


भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशच्या विद्यमान नेतृत्वाने मागील निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, जर मुद्दा निवडणुकीचा असेल, तर सर्वप्रथम निष्पक्ष निवडणुका होणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावर जोर दिला की,भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाहीची वैधता टिकून राहावी असे वाटते. पुढे त्यांनी सांगितले त्यांना विश्वास आहे की बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून जेही नेतृत्व पुढे येईल, ते भारताशी असलेल्या संबंधांविषयी संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवेल, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये किंचित तणाव निर्माण झाला आहे, हेही त्यांनी मान्य केले. गेल्या महिन्यातच बांगलादेशात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या मागणीवर भारत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.

Comments
Add Comment

Karnataka News : पावसात ४० वर्षांचं चंदनाचं झाड कोसळलं; ८५ वर्षीय वृद्ध लखपती!

कर्नाटक : पावसाळ्यात (Monsoon) मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि तुफान वाऱ्यांमुळे (Strong Winds) झाडं कोसळल्याच्या घटना वारंवार घडतात. अशा

Devendra Fadnavis : नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी

वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक मुंबई : केंद्रीय

India Indonesia Agreements : भारत-इंडोनेशियात संरक्षण, खनिज, बंदर विकासासह अनेक महत्त्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याला मोठे यश जकार्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया

INS Mahendragiri : अण्वस्त्र सज्ज ‘आयएनएस महेंद्रगिरी’ शनिवारी ताफ्यात

आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नौदलाची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाकडून सर्वोच्च नागरी सन्मान ‘बिंतांग आदिपूर्णा’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी देशातील

Taj Mahal : ताजमहाल ‘तेजो महालय’ होता का ? हायकोर्टाने केंद्र सरकार आणि एएसआयकडे मागितले उत्तर

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील ताजमहाल हे मूळचे 'तेजो महालय' हिंदू मंदिर होते का, या दाव्याशी संबंधित