भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी करत आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या निर्णयामागे बांगलादेशातील परिस्थिती कारणीभूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना विचारण्यात आले की, शेख हसीना जितका काळ इच्छितात तितका काळ भारतात राहू शकतात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हा वेगळा प्रश्न होता. त्या काही खास परिस्थितींमध्ये येथे आल्या, पण निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.” परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की भारत हा बांगलादेशचा शुभचिंतक आहे.


भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशच्या विद्यमान नेतृत्वाने मागील निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, जर मुद्दा निवडणुकीचा असेल, तर सर्वप्रथम निष्पक्ष निवडणुका होणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावर जोर दिला की,भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाहीची वैधता टिकून राहावी असे वाटते. पुढे त्यांनी सांगितले त्यांना विश्वास आहे की बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून जेही नेतृत्व पुढे येईल, ते भारताशी असलेल्या संबंधांविषयी संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवेल, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये किंचित तणाव निर्माण झाला आहे, हेही त्यांनी मान्य केले. गेल्या महिन्यातच बांगलादेशात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या मागणीवर भारत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.

Comments
Add Comment

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी

पाकिस्तानला फुटणार घाम ! रशियाने भारताला दिली मोठी गुड न्यूज, लवकरच...

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी मात्र पाकिस्तानला घाम फोडणारी अशी बातमी समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूर

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर