नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत


गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या अानुषंगाने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी वसई-विरारमध्ये पार पडली आहे.

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. हे गल्लीपासून तर दिल्लीतील राजकारणातील विविध घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती महायुतीच्या फुटीरतेची. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी एकमेकांविरुद्ध प्रचार केला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली प्रचार सभा तर राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजली. "अहंकार आणि लंका दहन" या विषयावर शिंदे आणि फडणवीस यांनी केलेले भाष्य महाविकास आघाडीतील काही नेत्यांसाठी आयते कोलीत हाती लागल्यासारखे होते.

कार्यकर्त्यांमध्ये ही लढाई निकालानंतर सुद्धा सुरूच राहणार असली तरी, वरिष्ठ नेत्यांकडून मात्र निवडणूक संपली विषय संपला असाच संदेश दिल्या जात आहे. तथापि, वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. एकत्र लढून महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वसई विरारचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाल्याने, महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.या बैठकीसाठी आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, वसंत चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा सरचिटणीस अतुल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित होते.
Comments
Add Comment

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या