नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत


गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या अानुषंगाने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक शनिवारी वसई-विरारमध्ये पार पडली आहे.

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. हे गल्लीपासून तर दिल्लीतील राजकारणातील विविध घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. राज्यात नुकतेच नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती महायुतीच्या फुटीरतेची. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच आपल्या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी एकमेकांविरुद्ध प्रचार केला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली प्रचार सभा तर राज्याच्या कानाकोपऱ्यात गाजली. "अहंकार आणि लंका दहन" या विषयावर शिंदे आणि फडणवीस यांनी केलेले भाष्य महाविकास आघाडीतील काही नेत्यांसाठी आयते कोलीत हाती लागल्यासारखे होते.

कार्यकर्त्यांमध्ये ही लढाई निकालानंतर सुद्धा सुरूच राहणार असली तरी, वरिष्ठ नेत्यांकडून मात्र निवडणूक संपली विषय संपला असाच संदेश दिल्या जात आहे. तथापि, वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे. एकत्र लढून महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वसई विरारचे भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत ही बैठक झाल्याने, महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.या बैठकीसाठी आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, वसंत चव्हाण, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, शिवसेना जिल्हा सरचिटणीस अतुल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुदेश चौधरी उपस्थित होते.
Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई