सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत वाहन पडल्याने दोन महिलांसह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये एकूण सात जण होते, त्यापैकी एक गंभीर जखमी आहेत.





मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ बीएन ०५५ ही इनोव्हा कार दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना नियंत्रण सुटून दरीत कोसळली. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिकांच्या मदतीने आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहाय्याने दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. घाटातील संरक्षक भिंतींची कामे अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, भाविकांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Nashik : नाशिकमधील वृक्षतोडीला ‘हरित लवादा’ची तूर्तास स्थगिती, पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

नाशिक : नाशिककरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे कारण शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

University in Afghanistan : पाकिस्तानचा अफगाणिस्तान विद्यापीठावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. तालिबान सरकारने दावा केला की