भारत-चीन सीमेजवळ मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कराला अटक

गंगटोक : मोस्ट वॉन्टेड महिला वाघ तस्कर यांगचेन लाचुंगपा अखेर तपासयंत्रणांच्या जाळ्यात अडकली आहे. भारत-चीन सीमेजवळ करण्यात आलेल्या कारवाईत तिला पकडण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून देशातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्याघ्रतस्करीच्या अनेक प्रकरणांत तिचा शोध सुरू होता. मध्यप्रदेश व्याघ्र धडक पथक आणि नवी दिल्ली येथील वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्त कारवाई करून २ डिसेंबर रोजी उत्तर सिक्कीममधील लाचुग येथे यांगचेनला ताब्यात घेतले. या भागात तापमान उणे सात अंशांपर्यंत घसरले असतानाही पथकाने रचलेल्या सापळ्यात ती सापडली. तपासयंत्रणांना तिचा मागोवा अनेक महिन्यांपासून लागत नव्हता.


यांगचेन मूळची तिबेटची असून भारतात दिल्ली आणि सिक्कीममध्ये राहते. तिला २०१७ मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. पण जामिनावर सुटताच ती फरार झाली आणि त्यानंतर तिचा शोध अधिकच कठीण झाला. तिच्या अटकेनंतर गंगटोकमधून ट्रान्झिट वॉरंट मिळवण्याची प्रक्रिया सुरू असून तिला लवकरच मध्यप्रदेशमध्ये आणण्यात येणार आहे. मध्यप्रदेश व्याघ्र धडक पथकाने आतापर्यंत ३१ शिकारी आणि तस्करांना अटक केली आहे. यांगचेनच्या अटकेमुळे व्याघ्रतस्करीच्या अनेक प्रकरणांबाबत नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा