शैक्षणिक सहली, लग्नसमारंभांसाठी 'लालपरी' सुसाट

खासगी वाहनांपेक्षा एसटीतून होणार पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास


स्वप्नील पाटील पेण : नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान अनेक शैक्षणिक सहली आणि त्यातच लग्नसमारंभाचा सीजन असल्याने या दोन महिन्यात एसटीच्या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड विभागाची एसटी प्रासंगिक कराराच्या माध्यमातून सुसाट धावत असून नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या रायगड विभागाच्या ९४ बसेस बुक झाल्या. या बुकिंगच्या माध्यमातून एसटीने महिनाभरात ३६५७७ किमीचा प्रवास करून प्रवाशांची तसेच विद्यार्थी आणि समारंभातील कुटुंबीयांची सेवा केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांपेक्षा एसटीच्या माध्यमातून आपला प्रासंगिक करार करून पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास यापुढे देखील प्रवाशांनी करावा असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांनी प्रवाशांना केले आहे. महाराष्ट्राला लाभलेली धार्मिक संस्कृती, गडकिल्ले आणि कोकण किनारपट्टीवर असणारी असंख्य पर्यटन स्थळे यामुळे अनेक शैक्षणिक सहली अशा ठिकाणी प्रामुख्याने जात असतात. त्यातच याच दरम्यान सुरू असणारे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी लांबचा आणि असंख्य प्रवाशांचा प्रवास असेल तर एकावेळी अनेक गाड्या नेण्यापेक्षा अनेक कुटुंब एसटी सोबत प्रासंगिक करार करून आपला सुखाचा प्रवास करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून रायगडाची एसटी सुसाट धावताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील आठ आगारांच्या माध्यमातून एसटीच्या ९४ गाड्या बुक झाल्या असून सवलतीच्या ५४, तर विनासवलतीच्या ४० बसेस बुक झाल्या आहेत. तर या ९४ बसेसने सवलतीच्या माध्यमातून २५२८९ किलोमीटर आणि विनासवलतीच्या माध्यमातून ११,२८८ असा एकूण ३६,५७७ किमीचा प्रवास केला असल्याने रायगड विभागाच्या एसटीला प्रासंगिक कराराच्या माध्यमातून असणारी पसंती सहजपणे लक्षात येते.


...असा आहे एसटीचा प्रासंगिक करार फायदेशीर




  1. परवडणारा खर्च, प्रतिव्यक्ती खर्च कमी, इंधन, चालक, मानधन, टोल, पार्किंग यांचा स्वतंत्र खर्च नाही .

  2. अनुभवी चालक, नियमित वाहन तपासणी, सरकारी नियमांचे पालन, सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवास

  3. कायदेशीर आणि विश्वास, सरकारी संस्था असल्याने फसवणूक नाही, परवानगी, विमा, फिटनेस सर्व कायदेशीर व अद्ययावत .

  4. सर्वांना एकत्र नेण्याची सोय, एसटी वर्क शॉप आणि डेपो सर्वत्र असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा. जलद मिळते, खासगी वाहन बिघडल्यास पर्यायी वाहन मिळणे कठीण.

  5. प्रवाशांसाठी विमा संरक्षण उपलब्ध, अपघात, अडचणी, जबाबदारी ठरलेली असते.

  6. अधिकृत दरसूची, पावती व करारपत्र, ऑनलाइन तसेच डेपोवार सोपा करार.


खासगी वाहनांपेक्षा सरकारी संस्था असणाऱ्या आणि गरिबांच्या खिशाला परवडणाऱ्या एसटीचा प्रवास हा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून नेहमीच फायदेशीर ठरला आहे. एखादी सहल किंवा लग्नसमारंभारखा एखादा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर त्यासाठी देखील एसटीचा अधिकृत आणि पारदर्शक करार करून एसटीचाच प्रवास करा आणि आपला सुखकर तसेच आर्थिक बचत करून प्रवास करा. - डॉ. सुहास चौरे ( विभाग नियंत्रक - रायगड )

Comments
Add Comment

'Deool Band-2' Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

मुंबई : महाराष्ट्रभर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर घुमवत बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.