गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश


पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या प्रकारानंतर उठाबशा काढल्याने प्रकृती बिघडलेल्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना वसईत मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणी तत्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वसई तालुका गटशिक्षण अधिकारी, वसई शिक्षण विस्तार अधिकारी आणि वालिव केंद्र प्रमुख यांचा समावेश आहे.


सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावी मध्ये शिकणाऱ्या काजल (अंशिका) गौड या मुलीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला होता. या प्रकरणी वालिव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले आहे. तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती.


दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत असल्याबाबत तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी ( शिक्षण ) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे.


शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील तरतुदीचे पालन न करणे असे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.

Comments
Add Comment

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

Holi Safety Tips And Tricks: होळीला बाजारात खरा रंग कसा ओळखायचा?

मुंबई: केमिकल रंगांचा वाढता धोका सगळीकडेच आहे. होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण. मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा