राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये एकीकडे दुबार मतदार आणि आरक्षण मर्यादेमुळे वाद निर्माण झाला. तर ऐन मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने नगरपरिषदेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय दिल्याने मतमोजणी लांबणीवर पडली. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ज्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. या ठिकाणी ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र वादात राहिलेल्या नगरपरिषदांसाचे मतदान २० डिसेंबरला झाल्यावर राज्यातील सर्व २८८ नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबरला दिला. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबर रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.


न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानावर आधीच्या निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडू शकतो. यामुळे सर्व निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या युक्तीवादावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिले. मात्र या आदेशाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ४ डिसेंबरला स्वीकारली.


याचिकाकर्ते राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील 'एआयएमआयएम'चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेमध्ये तत्काळ मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली असून आज यावर सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते मो. युसूफ पुंजानी यांच्यावतीने अॅड. फिरोज शेकूवाले यांनी दिली. या याचिकेच्या निर्णयावर स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.


Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा