वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही. वरळीतील एका खासगी हॉटेलमध्ये भाजपप्रणित युनियनचा फलक लावण्यावरून शिउबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राडा घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.


वरळीतील हॉटेल सेंट रेजिसमध्ये भाजपने आपली कामगार संघटना स्थापन केली असून, त्याबाबतचा फलक लावण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. मात्र, शिउबाठाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करीत, फलक लावण्यास विरोध केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्याला जशासतसे उत्तर दिल्यामुळे हॉटेलच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागला.


याविषयी माहिती देताना स्थानिक पदाधिकारी समीर कदम म्हणाले, “आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही तेथे जमलो होतो. कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, शिउबाठाच्या काही कार्यकर्त्यांनी उगाच गोंधळ घालायला सुरवात केली. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. याविषयी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा पूर्ण हक्क आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे”, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला