पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभा नियम ३७७ अन्वये मागणी केली.


पंतप्रधान आवास योजने अतंर्गत राज्य तसेच संघ राज्य येथील सर्व पत्र लाभार्थी यांना मुलभूत सुविधांनी युक्त असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य तसेच संघ राज्य यांना सर्वतोपरी मदत करीत आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने पंतप्रधान आवास योजना-शहर नव्या रुपात सुरु केली असून त्यानुसार या सुधारती पंतप्रधान आवास योजना-शहर २.० (पीएमएवाई-यु २.०) योजनेला १ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली. या योजनेच्या माध्यमातून राज्य तसेच संघ राज्य क्षेत्र यांनी प्राधिकरणा मार्फत शहरी भागांसाठी गरीब, मध्यमवर्गातील कुटुंबांतील लाभार्थी यांच्यासाठी माफक दरात घरे (एएचपी) , माफक दरात घरे (एआरएच) तसेच व्याज सबसिडी योजनेच्या (आईएसएस) माध्यमातून योजनेसाठी मदत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज जमा करण्यासाठी पीएमएवाई-२.० च्या संकेतस्थळावरून (https://pmay-urban.gov.in) करावे लागणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी लेखी पत्राद्वारे खासदार वायकर यांना कळवले आहे.


तसेच राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणामार्फत पीएमएवाई-यु २.० मधील नियम व तरतुदीला अनुसरून योजना तयार करून राज्य सरकारच्या तसेच निरीक्षण समिती यांच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, अशी सूचना हि केंद्रीय गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी खासदार वायकर यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र