पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मानवी वस्त्यांच्या जवळपास हे वन्य प्राणी मुक्तपणे फिरताना दिसत असून, गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी हल्ल्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.


नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगत साकार नगरी सोसायटीजवळ एका तरुणावर झालेला हल्ला चिंताजनक ठरला आहे. तनिष नवनाथ परदेशी हा १८ वर्षीय तरुण रात्री फोनवर बोलत उभा असताना बिबट्याने अचानक झडप घातली. त्याच्या पोटरीवर खोल ओरखडे झाले. तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्याने तो सुदैवाने बचावला असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.


घटनेनंतर वन विभागाने रात्रीच शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या मदतीने जवळच्या मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात तब्बल तीन बिबटे फिरताना दिसले. याच भागात एका दिवसात चार पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात मागील काही वर्षांत अशा घटना सातत्याने घडत असल्याने मानव–वन्यजीव संघर्ष तीव्र होऊ लागला आहे.


जुन्नर तालुक्यातील धोलवडमध्येही अशीच भीतीची घटना घडली. निसर्गरम्य परिसरात बिबट्यांचा वावर स्थिरपणे वाढत असून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याची गरज भासते आहे. वन विभागाने नागरिकांना अंधारात बाहेर पडू नये, एकट्याने फिरणे टाळावे आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित कळवावे, असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय