पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र, या प्रक्रियेत नाफेड, एनसीसीएफ, काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविरोधात विश्वास माधवराव मोरे यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तसेच मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या कथित घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अहवाल १६ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.


केंद्र सरकारच्या योजनेत शेतकऱ्यांना अधिक दर मिळावा आणि ग्राहकांना कांदा योग्य दरात उपलब्ध व्हावा, यासाठी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून कांदा खरेदी करायची योजना आखण्यात आली होती तथापि, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांनी काही व्यापारी, फेडरेशनचे सदस्य आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्याशी मिळून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता, व्यापाऱ्यांकडून स्वस्त दरात घेतलेला कांदा शेतकऱ्यांचा कांदा दाखवला. या पद्धतीने स्वस्त दरातील कांदा वाढीव दराने केंद्राला विकून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.