मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची निवडणूक संचालन समिती जाहीर

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. ज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून मतमोजणी बाकी आहे. तर इतर दोन टप्प्यातील निवडणूकीसाठी सर्व पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. दरम्यान तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ करिता भारतीय जनता पक्षाची मुंबई निवडणूक संचालन समिती घोषित केली आहे.


अमित साटम यांच्या अध्यक्षतेखाली जाहिर करण्यात आलेल्या निवडणूक संचालन समितीमध्ये पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. ज्यात आशिष शेलार, अॅड. मंगलप्रभात लोढा, अॅड. राहुल नार्वेकर, प्रकाश मेहता, किरीट सोमैय्या, कालिदास कोळंबकर, मिहिर कोटेचा, पराग शाह, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ या महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून एकूण १४४ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.



दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या मुंबई निवडणूक संचालन समितीमधील निमंत्रितांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

फेरीवाल्यांवरील कारवाईत सहायक आयुक्तांची बोटचेपी भूमिका

ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर