प्रवाशांचा हल्लाबोल होणार ? सहा विमानतळावरील इंडिगोची १८० पेक्षा अधिक विमान रद्द

मुंबई: देशांतर्गत चालणारी मोठी विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) १८० पेक्षा अधिक विमाने रद्द केली आहेत. आज सकाळी प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदललेल्या हवाई मार्गदर्शन तत्वांचे पालन करण्यासाठी आवश्यक तितका कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने व वैमानिकांसाठी नवी 'ड्युटी नोर्म ' अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने तांत्रिक कारणामुळे कंपनीने हे मोठे पाऊल उचलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवसभरात आणखी काही विमानेही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. अंतिम आकडा संध्याकाळपर्यंत अपेक्षित असला तरी प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगलोर यासह ६ विमानतळाचा समावेश असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.


या विमानांपैकी ८६ विमाने ज्यातील ४१ येणारी व ४५ जाणारी विमाने मुंबई विमानतळातून रद्द करण्यात आली असून उर्वरित ७३ विमाने बंगलोर विमानतळावरून रद्द करण्यात आली आहे. दिल्ली विमानतळावरूनही ३३ विमाने रद्द करण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


'एफडीटीएल (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन) नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीपासून इंडिगोला कर्मचाऱ्यांची मोठी तीव्र कमतरता भासत आहे त्याचा परिणाम म्हणून विमानतळांवर उड्डाणे रद्द होत आहेत आणि त्यांच्या कामकाजात मोठा विलंब होत आहे' असे एका सूत्राने बुधवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.


डीजीसीएने (Directorate General of Civil Aviation DGCA) आधीच सांगितले आहे की संस्था इंडिगोच्या उड्डाणांच्या व्यत्ययांची चौकशी करत आहे आणि एअरलाइनला सध्याच्या परिस्थितीची कारणे तसेच उड्डाणे रद्द करणे याविषयी विचारणा करत विलंब कसा कमी करता येईल त्यानुसार कमी करण्याच्या त्यांच्या योजना सादर करण्यास सांगितले आहे.


उपलब्ध माहितीनुसार,दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख विमानतळांवर एअरलाइनचा ऑन-टाइम परफॉर्मन्स (OTP) ३ डिसेंबर रोजी १९.७% घसरला, कारण त्यांना त्यांच्या सेवा चालविण्यासाठी आवश्यक क्रू मिळविण्यात संघर्ष करावा लागला, जो २ डिसेंबरच्या जवळपास निम्म्यावरून ३५% होता.


वैमानिकांच्या संघटनेने भारतीय वैमानिक संघ (FIP) असा आरोप केला आहे की, कॉकपिट क्रूसाठी नवीन नियमांची पूर्ण अंमलबजावणी होण्यापूर्वी इंडिगोने दोन वर्षांची पूर्वतयारी विंडो मिळवूनही अस्पष्टपणे" भरती स्थगित केली होती. संस्थेने म्हटले आहे की त्यांनी सुरक्षा नियामक, डीजीसीए (DGCA) ला विनंती केली आहे की,नवीन उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादा (FDTL) नियमांनुसार सुरक्षितपणे आणि विश्वासार्हपणे त्यांच्या सेवा चालविण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यास एअरलाइन्सच्या हंगामी उड्डाण वेळापत्रकांना मान्यता देऊ नये.


बुधवारी रात्री उशिरा नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ला लिहिलेल्या पत्रात, FIP ने DGCA ला विनंती केली आहे की जर इंडिगो स्वतःच्या टाळता येण्याजोग्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांना दिलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यात अपयशी ठरली तर पीक टाईम असलेल्या व सुट्टी आणि धुक्याच्या हंगामातील काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय स्लॉट चालवण्याची क्षमता असलेल्या इतर एअरलाइन्सना स्लॉट पुन्हा वेळ निवडण्याची समान संधी ग्राहकांना देण्याचा करण्याचा विचार करावा असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने