प्रवाशांचा हल्लाबोल होणार ? सहा विमानतळावरील इंडिगोची १८० पेक्षा अधिक विमान रद्द

मुंबई: देशांतर्गत चालणारी मोठी विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) १८० पेक्षा अधिक विमाने रद्द केली आहेत. आज सकाळी प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदललेल्या हवाई मार्गदर्शन तत्वांचे पालन करण्यासाठी आवश्यक तितका कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने व वैमानिकांसाठी नवी 'ड्युटी नोर्म ' अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने तांत्रिक कारणामुळे कंपनीने हे मोठे पाऊल उचलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिवसभरात आणखी काही विमानेही रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. अंतिम आकडा संध्याकाळपर्यंत अपेक्षित असला तरी प्रवाशांना आज गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगलोर यासह ६ विमानतळाचा समावेश असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.


या विमानांपैकी ८६ विमाने ज्यातील ४१ येणारी व ४५ जाणारी विमाने मुंबई विमानतळातून रद्द करण्यात आली असून उर्वरित ७३ विमाने बंगलोर विमानतळावरून रद्द करण्यात आली आहे. दिल्ली विमानतळावरूनही ३३ विमाने रद्द करण्यात आली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


'एफडीटीएल (फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन) नियमांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीपासून इंडिगोला कर्मचाऱ्यांची मोठी तीव्र कमतरता भासत आहे त्याचा परिणाम म्हणून विमानतळांवर उड्डाणे रद्द होत आहेत आणि त्यांच्या कामकाजात मोठा विलंब होत आहे' असे एका सूत्राने बुधवारी प्रसारमाध्यमांना सांगितले.


डीजीसीएने (Directorate General of Civil Aviation DGCA) आधीच सांगितले आहे की संस्था इंडिगोच्या उड्डाणांच्या व्यत्ययांची चौकशी करत आहे आणि एअरलाइनला सध्याच्या परिस्थितीची कारणे तसेच उड्डाणे रद्द करणे याविषयी विचारणा करत विलंब कसा कमी करता येईल त्यानुसार कमी करण्याच्या त्यांच्या योजना सादर करण्यास सांगितले आहे.


उपलब्ध माहितीनुसार,दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख विमानतळांवर एअरलाइनचा ऑन-टाइम परफॉर्मन्स (OTP) ३ डिसेंबर रोजी १९.७% घसरला, कारण त्यांना त्यांच्या सेवा चालविण्यासाठी आवश्यक क्रू मिळविण्यात संघर्ष करावा लागला, जो २ डिसेंबरच्या जवळपास निम्म्यावरून ३५% होता.


वैमानिकांच्या संघटनेने भारतीय वैमानिक संघ (FIP) असा आरोप केला आहे की, कॉकपिट क्रूसाठी नवीन नियमांची पूर्ण अंमलबजावणी होण्यापूर्वी इंडिगोने दोन वर्षांची पूर्वतयारी विंडो मिळवूनही अस्पष्टपणे" भरती स्थगित केली होती. संस्थेने म्हटले आहे की त्यांनी सुरक्षा नियामक, डीजीसीए (DGCA) ला विनंती केली आहे की,नवीन उड्डाण कर्तव्य वेळेच्या मर्यादा (FDTL) नियमांनुसार सुरक्षितपणे आणि विश्वासार्हपणे त्यांच्या सेवा चालविण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यास एअरलाइन्सच्या हंगामी उड्डाण वेळापत्रकांना मान्यता देऊ नये.


बुधवारी रात्री उशिरा नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ला लिहिलेल्या पत्रात, FIP ने DGCA ला विनंती केली आहे की जर इंडिगो स्वतःच्या टाळता येण्याजोग्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांना दिलेल्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यात अपयशी ठरली तर पीक टाईम असलेल्या व सुट्टी आणि धुक्याच्या हंगामातील काळात कोणत्याही व्यत्ययाशिवाय स्लॉट चालवण्याची क्षमता असलेल्या इतर एअरलाइन्सना स्लॉट पुन्हा वेळ निवडण्याची समान संधी ग्राहकांना देण्याचा करण्याचा विचार करावा असे म्हटले आहे.

Comments
Add Comment

‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच

पंतप्रधानांबाबतचे काँग्रेस खासदारांचे वर्तन संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारे

भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र मुंबई : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेमध्ये

Islamabad Blast: मशिदीत नमाज सुरु असताना स्फोट, १२ ठार; इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित

इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका इमामबारगाहमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा!, मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस