आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कारण या विमानतळवरील दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामात एक मशिद अडथळा ठरत आहे.एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.


कोलकाता विमानतळावरील वाढत्या उड्डाणसंख्येच्या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याने विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्ताराचे काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांची क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. मात्र अडथळा ठरत असलेली मशिद हटवण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.



दरम्यान,आता भाजपनेही या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घेरले आहे. भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "कोलकाता विमानतळाच्या धावपट्टी परिसरात असलेल्या मशि‍दीबद्दल भाजप बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दुसऱ्या धावपट्टीवर असलेली एक मशिद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अडथळा निर्माण करत आहे. धावपट्टीचा थ्रेशहोल्ड ८८ मीटरने सरकला आहे. यामुळे पहिली धावपट्टी उपलब्ध नसताना दुसऱ्या धावपट्टीच्या वापरावर परिणाम होतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राजकारण करू नये. हे ममता बॅनर्जि यांनी समजून घेतले पाहिजे."





तसेच अमित मालवीय यांनी ममता सरकारवर धार्मिक भावना या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रवाशांच्या जीवापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत आणि हे एक बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान बांधकाम हटवणं मशि‍दीच्या कमिटीला योग्य वाटत नसल्याने त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला असून मशि‍दीला विमानतळ परिसराच्या बाहेर किंवा अन्य कोणत्या ठिकाणी हलवण्याबाबत सहमती दर्शवत नाही आहेत.

Comments
Add Comment

FASTag Rules : आता टोल नाक्यावरुन सुसाट जा...! फास्टॅगच्या 'KYV' कटकटीतून कायमची सुटका; NHAI चा मोठा निर्णय.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा