आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कारण या विमानतळवरील दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामात एक मशिद अडथळा ठरत आहे.एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.


कोलकाता विमानतळावरील वाढत्या उड्डाणसंख्येच्या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याने विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्ताराचे काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांची क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. मात्र अडथळा ठरत असलेली मशिद हटवण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.



दरम्यान,आता भाजपनेही या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घेरले आहे. भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "कोलकाता विमानतळाच्या धावपट्टी परिसरात असलेल्या मशि‍दीबद्दल भाजप बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दुसऱ्या धावपट्टीवर असलेली एक मशिद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अडथळा निर्माण करत आहे. धावपट्टीचा थ्रेशहोल्ड ८८ मीटरने सरकला आहे. यामुळे पहिली धावपट्टी उपलब्ध नसताना दुसऱ्या धावपट्टीच्या वापरावर परिणाम होतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राजकारण करू नये. हे ममता बॅनर्जि यांनी समजून घेतले पाहिजे."





तसेच अमित मालवीय यांनी ममता सरकारवर धार्मिक भावना या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रवाशांच्या जीवापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत आणि हे एक बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान बांधकाम हटवणं मशि‍दीच्या कमिटीला योग्य वाटत नसल्याने त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला असून मशि‍दीला विमानतळ परिसराच्या बाहेर किंवा अन्य कोणत्या ठिकाणी हलवण्याबाबत सहमती दर्शवत नाही आहेत.

Comments
Add Comment

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)