आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कारण या विमानतळवरील दुसऱ्या धावपट्टीच्या बांधकामात एक मशिद अडथळा ठरत आहे.एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.


कोलकाता विमानतळावरील वाढत्या उड्डाणसंख्येच्या पार्श्वभूमीवर दुसरी धावपट्टी तयार करणे अत्यंत गरजेचे असल्याने विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्ताराचे काम सुरू आहे. यामुळे प्रवाशांची क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. मात्र अडथळा ठरत असलेली मशिद हटवण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.



दरम्यान,आता भाजपनेही या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घेरले आहे. भाजप प्रवक्ते अमित मालवीय यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, "कोलकाता विमानतळाच्या धावपट्टी परिसरात असलेल्या मशि‍दीबद्दल भाजप बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी राज्यसभेत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता. नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दुसऱ्या धावपट्टीवर असलेली एक मशिद प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अडथळा निर्माण करत आहे. धावपट्टीचा थ्रेशहोल्ड ८८ मीटरने सरकला आहे. यामुळे पहिली धावपट्टी उपलब्ध नसताना दुसऱ्या धावपट्टीच्या वापरावर परिणाम होतो. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राजकारण करू नये. हे ममता बॅनर्जि यांनी समजून घेतले पाहिजे."





तसेच अमित मालवीय यांनी ममता सरकारवर धार्मिक भावना या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रवाशांच्या जीवापेक्षा महत्त्वाच्या ठरत आहेत आणि हे एक बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा आरोप केला आहे. दरम्यान बांधकाम हटवणं मशि‍दीच्या कमिटीला योग्य वाटत नसल्याने त्यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला असून मशि‍दीला विमानतळ परिसराच्या बाहेर किंवा अन्य कोणत्या ठिकाणी हलवण्याबाबत सहमती दर्शवत नाही आहेत.

Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली