Attack on Saudi Arabia : सौदी अरेबियावरील हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही; अफवांवर विश्वास ठेऊ नका

- भारतीय दूतावासाने दिली माहिती


इराणने रविवारी (८ मार्च) सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र रियाधमधील भारतीय दूतावासाने आज म्हणजेच सोमवार ९ मार्च रोजी स्पष्ट केले की या हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. तसेच त्यांनी सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, आम्ही सौदी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत.



भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची :


यापूर्वी सौदी नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले होते की अल-खरज शहरात झालेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या दोन जणांमध्ये एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक होता. मात्र आता भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.



काय सांगितले भारतीय दूतावासाने :


भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले, “काल संध्याकाळी अल-खरज येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.” दूतावासाने पुढे सांगितले, “कौन्सुलर अधिकारी वाय. साबिर काल रात्री अल-खरज येथे गेले होते आणि या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या भारतीय नागरिकाची त्यांनी भेट घेतली.” दूतावासाने पुढे माहिती दिली की सध्या त्या जखमी व्यक्तीवर अल-खरजमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, सौदी प्रवक्त्यांनी म्हटले की नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे आणि अशा प्रकरणांमध्ये निर्धारित प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबियाने निवेदन जारी करत सांगितले की इराणी हल्ल्यांमुळे देशात संताप वाढत आहे.दरम्यान, भारतीय दूतावासाने रविवारी आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली. यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्यास सांगितले आहे. दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “या प्रदेशातील आणि सौदी अरेबियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्या सौदी अरेबियामध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या