छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. काल (३ डिसेंबर) सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नक्षली कमांडर मंगूस यालाही ठार करण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने, सुरक्षा दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ जवान जखमी झाले आहेत. ही चकमक अद्याप सुरू असून, सुरक्षा दल मोठ्या शौर्याने नक्षलवाद्यांसोबत सामना करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि दंतेवाडा सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे गट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बीजापूर पोलिसांचे जिल्हा राखीव रक्षक, विशेष कार्य दल आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्त अभियान सुरू केले. केशकुतुलच्या जंगलात या सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली. त्यानंतर चकमक सुरू झाली. काल सकाळपासून या भागात थोड्याफार फरकाच्या वेळाने गोळीबार सुरू आहे.


या चकमकीमध्ये मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाला घेरले आहे. जवान हा घेरा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे, ज्याचा उद्देश मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा सुपडा साफ करणे आहे. ही चकमक पूर्ण झाल्यावर या घटनेबाबत अंतिम माहिती जाहीर केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह, चकमकीच्या ठिकाणाहून ३०३ आणि ३५० मिमी एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे मुख्य कॉन्स्टेबल मोनू वड्डी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले आहेत. तर कॉन्स्टेबल सोमदेव यादव जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

पुँछमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

नवी दिल्ली : भारतीय शौर्याचे प्रतीक आणि कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य

खामेनींच्या मृत्यूनंतर भारतात हाय अलर्ट, जम्मू काश्मीरमध्ये बंदोबस्तात वाढ

नवी दिल्ली : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आणि भारतात हाय अलर्ट जाहीर झाला आहे.

धर्मांतराविरुद्ध सर्व देशवासियांनी एकत्र येणं गरजेचं - अमित शाह

शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे.

Mumbai Airport: परदेशी प्रवास ठप्प; मुंबई विमानतळावरील १२५ विमानांची उड्डाणं रद्द

मुंबई: मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबईतील