छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. काल (३ डिसेंबर) सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नक्षली कमांडर मंगूस यालाही ठार करण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने, सुरक्षा दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ जवान जखमी झाले आहेत. ही चकमक अद्याप सुरू असून, सुरक्षा दल मोठ्या शौर्याने नक्षलवाद्यांसोबत सामना करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि दंतेवाडा सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे गट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बीजापूर पोलिसांचे जिल्हा राखीव रक्षक, विशेष कार्य दल आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्त अभियान सुरू केले. केशकुतुलच्या जंगलात या सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली. त्यानंतर चकमक सुरू झाली. काल सकाळपासून या भागात थोड्याफार फरकाच्या वेळाने गोळीबार सुरू आहे.


या चकमकीमध्ये मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाला घेरले आहे. जवान हा घेरा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे, ज्याचा उद्देश मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा सुपडा साफ करणे आहे. ही चकमक पूर्ण झाल्यावर या घटनेबाबत अंतिम माहिती जाहीर केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह, चकमकीच्या ठिकाणाहून ३०३ आणि ३५० मिमी एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे मुख्य कॉन्स्टेबल मोनू वड्डी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले आहेत. तर कॉन्स्टेबल सोमदेव यादव जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई

Threat Mail : मोठी बातमी! राजधानी दिल्लीत खळबळ, संसद भवनासह ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एक मेल आला अन् थेट...

नवी दिल्ली :  देशाच्या संसदेसह राजधानीतील नऊ नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा धमकीचा ईमेल आल्याने

जम्मू आणि हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता, हवामान खात्याने 'या' राज्यांना दिला इशारा

दिल्ली: हवामान खात्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. आयएमडीने

'देशातील नक्षलवादाचा ३१ मार्चपर्यंत समूळ नायनाट करणार'

रायपूर  : केंद्र सरकारच्या सुरक्षा-केंद्रित रणनीतीमुळे आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे डाव्या

महाराष्ट्रात लवकरच मतदारयाद्यांची सखोल तपासणी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने सध्या पाच राज्यांतील मतदारयाद्यांची सखोल तपासणीवर (एसआयआर) लक्ष केंद्रित

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी