छत्तीसगडच्या बस्तर भागात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक! १५ नक्षलवादी ठार तर ३ जवान शहीद

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर विभागातील बीजापूर-दंतेवाडा सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. काल (३ डिसेंबर) सकाळपासून सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नक्षली कमांडर मंगूस यालाही ठार करण्यात आले आहे. मात्र दुर्दैवाने, सुरक्षा दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर २ जवान जखमी झाले आहेत. ही चकमक अद्याप सुरू असून, सुरक्षा दल मोठ्या शौर्याने नक्षलवाद्यांसोबत सामना करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बीजापूर आणि दंतेवाडा सीमेवर नक्षलवाद्यांचे मोठे गट असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बीजापूर पोलिसांचे जिल्हा राखीव रक्षक, विशेष कार्य दल आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्त अभियान सुरू केले. केशकुतुलच्या जंगलात या सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांशी गाठ पडली. त्यानंतर चकमक सुरू झाली. काल सकाळपासून या भागात थोड्याफार फरकाच्या वेळाने गोळीबार सुरू आहे.


या चकमकीमध्ये मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण जवानांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या गटाला घेरले आहे. जवान हा घेरा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम सुरू आहे, ज्याचा उद्देश मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा सुपडा साफ करणे आहे. ही चकमक पूर्ण झाल्यावर या घटनेबाबत अंतिम माहिती जाहीर केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.


नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह, चकमकीच्या ठिकाणाहून ३०३ आणि ३५० मिमी एसएलआर रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे मुख्य कॉन्स्टेबल मोनू वड्डी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे शहीद झाले आहेत. तर कॉन्स्टेबल सोमदेव यादव जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :